आयुष्य थोडसच असावं.....
पण.....
आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं,
आयुष्य थोडंच जगावं.....
पण.....
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की......
घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की.....
स्वार्थाचंही भान नसावं,
आयुष्य असंजगावं की......
मृत्यूने ही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर.....!!
मागून प्रेम कधी मिळत नाही
ते समोरच्याच्या मनात असाव लागत ...
आणि समोरच्याच्या मनात रुजायला
ते देवाला मान्य असाव लागत .....
खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही
ते शेवटी आपल्या नशिबात असाव लागत...
रागवू नकोस मला मनवता येणार नाही,
लपवू नकोस मला ओळखता येणार नाही,
डोळ्यात पाणी नको आणूस मला बघवणार नाही,
दूर जाऊ नकोस मला जगता येणार नाही,
उदास होऊ नकोस मला हसता येणार नाही,
हृदय तोडु नकोस मला जोडता येणार नाही,
आठणीँन मध्ये छलु नकोस मला सावरता येणार नाही,
साथ कधी सोडु नकोस मला तुला कधी सोडता येणार नाही,
रूसवा धरु नकोस मला शब्द सापडणार नाही,
एकटं मला सोडु नकोस आपल असं मला कोणी नाही,
गुंतलेल हृदय मोडू नकोस मला परत गुंतता येणार नाही,
तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही......
असं मी म्हणतं नाही कारण....
तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणारनाही।
तिला सहज विचारलं
माझ्यावाचून जगशील का..?
ती म्हणाली
माशाला विचार पाण्यावाचून
राहशीलका...?
हसून पुन्हा तिला विचारलं
मला सोडून कधी जाशील
का...?
* *
ती म्हणाली कळीला विचार
देठा वाचून फुलशील का..? ...
गंमत म्हणून तिला विचारलंतू
माझ्यावरखरच प्रेम करतेस का...?
ती म्हणाली,
पाणावलेल्या डोळ्यांनी,
नदीला विचार ती उगाच
सागराकडे धावते का??
साहेब आपल्या कामवाली सोबत प्रेम करत असतो.... . . . साहेब :- खरच तू माझ्या बायकोपेक्षा खूप गोड आहेस.. . . . कामवाली :- माहिती हाय साहेब, तुमचा ड्रायवर पण हेच बोलतो मला.... :D :D :D
त्याने मला विचारलं की
खरच आवडते ती तुला ?
जेव्हा तू एकटाच असतो
वेड लावते का जिवाला ?
मी हलकेच हसलो तेव्हा
अन् उत्तर दिलं मी त्याला
अरे, माझा प्रत्येक श्वास
तिच्यासाठी आसुसलेला
अरे मग तू विचार ना तिला
त्याने अनाहूत सल्ला दीला
का वाट पाहतो रे तू संधीची
करुनच टाक एकदा फैसला
थोडासा हळवा झालो तेव्हा
आवाजही थोडा ओला झाला
म्हटलं, अस नसतं रे मित्रा
इथे जीव तिच्यात गुंतलेला
अगदी असंच काही नाही मित्रा
की ती माझी सखी व्हायला हवी
जगाच्या पाठीवर कुठेही राहो
फक्त ती सुखात राहायला हवी..!!!!
जे तुला हि न कळले, जे मला हि न कळले, ते आपल्या नयनांना कळले... अबोल प्रेम हे आपले, आज सार्या जगाला कळले.... फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला, आज सार्या जगाने पाहिले... अन कळत नकळतच, आपल्या या मैत्रीच्या नात्याला, प्रेमाचे नाव जुळले...अजय इंगळे
जाणली तर नाती खोटी नसतात..
मनात असेल तर आपली असतात..
खोटी नाती तर स्वत: कधीच खोटी
नसतात..
माणसेच त्या
नात्यांना खोटे ठरवतात..
शेवटी कोण काही घेऊन जात नसते
जाताना हि चार माणसे पोहोचवायला
लागतात ...
अर्थात:- जाणली आणि मानली तर नाती
नाही तर बरी असते वावरतील माती..
तू लाजलिस
की,तुझ्या गालावरची
खळी खुप सुंदर दिसते,
मी पाहिलं
की,ती खळीही नेहमी
माझ्याकडे पाहून हसते,
कुणाची नजर न लागो म्हणून
मीच,
काजळ हॊउन
ओठाखाली बसतो
तुझ्याकडे
पाहनाऱ्या नजरेंना त्या नेहमी
तुझ्यापासून दूर करत असतो
वाऱ्यावर
उड़नाऱ्या केसांना जेव्हा
तू हळवारपने सावरतेस
गालावर रूळनारा केस
बाजूला करताना
कधी नजर माझ्यावर फिरवतेस
तेव्हा नकळत का होईना माझं
प्रतिबिंबही
मी तुझ्यात हरवून जातो
अबोल
मनाला पुन्हा माझ्याशीच
तुझ्या मिठीत
विसावताना पाहतो...!!!