पुढारी (डाँक्टराना ) :- माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सागां !
डाँक्टर :- आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे
फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत .
ऊजविकडील किडनिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे .त्या मुळे आतड्यामध्ये रास्तारोको आदोंलन चालू आहे
या सार्या गोष्टींचा ताण डोक्यातिल पक्षस्रेष्टीवंर पडत आहे त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत .
नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला जन्मोजन्मी वेड्यासारखी वात पाहायला लाग आता लग्नासाठी मुलगा शोधायला मलाच आहेर द्यावा लागेल तुझ्या लग्नाला!!!!!!!! !!! नाही जमणार तुला एकनिष्ठ राहायला कदाचित लागेल तुला उष्टं खायला कारणीभूत ठरेल जे प्रेम वाढायला मलाच यावं लागे…
प्रेम हे असच असत....
करताना ते कळत नसत आणि
केल्यावर ते उमगत नसत...
उमगल तरी समजत... नसत पण
आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत.
मित्रानो ते झाल्यावरच कळत
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते
दोन शब्दात ती कधीच समजत नसते l.
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.
जगण तेव्हा खुप छान
वाटायला लागत,,जेव्हा कोणी आपलसं वाटत.,,
विसरुन सगळकाही आपल्यासाठी वेळ
काढत...
जीवन तेव्हा जास्त सुंदर
वाटत,,जेव्हा कोणी मनात घर करत...
कधी भांडुन तर कधी रडुन ,,आपल्या मनावर
राज्य करत...
जीवन तेव्हा जगावस
वाटत,,जेव्हा कोणी परक आपल्यात रमत,स्वत:ला विसरुन
दुसर्यासाठी दिवस-राञ तडफडत ...
जीवन तेव्हा खरच सुंदर वाटु
लागत,,जेव्हा कोणी आपल्या प्रेमात पडत,,आपण
नाही म्हटल तरी आपल्या मनावर त्याचच
बंधन असत...
जीवन तेव्हा खुप
आवडत,,जेव्हा आपल्याला दुसर्यासाठी जगाव लागत..
मुलगा-माझ्याशी फ्रेंडशीप करशील का ? . मुलगी-नाही माझे parents allow अशा गोष्टींना करत नाहीत.. . मुलगा-हो का ? मला जस काय माझ्या बापाने all इंडिया पोरगी पटवा असोशिएशन चा चेअरमनच बनवलेय ना ...
रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं..
...हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं..
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं..
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं .
तुझ हसन मी miss करतोय..
तुझ क्षणात डोळे मिटुन, तिरक्या कोणात
मला पाहन मी miss करतोय !!!!
तुझ्या चेहर्याचा एकन एक कण...
रोमांच फ़िरवत असतो...
माझ्या मनाच्या कागदा वर...
तुझ माझ्यामध्ये हरवुन जाण मी miss करतोय !!!!
माझी आर्त हाक का नाही पोहचत आहे...
ही जीवघेनी शांतता त्यात खुप खुप दुर असतानाही...
माझ्या अगदी जवळ तुझ असन मी miss करतोय!!!!
गुरफ़टवुण टाक मला तुझ्या मीठीत...
वेढुण टाक मला तुझ्या केसांन मधुन...
कधीच नको आहे जिथुन सुटका मला !
जे तुला हि न कळले, जे मला हि न कळले, ते आपल्या नयनांना कळले... अबोल प्रेम हे आपले, आज सार्या जगाला कळले.... फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला, आज सार्या जगाने पाहिले... अन कळत नकळतच, आपल्या या मैत्रीच्या नात्याला, प्रेमाचे नाव जुळले...अजय इंगळे
तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं...
मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं...
पण , असं काहीतरी घडण्यासाठी...
तु एकदा तरी माझ्याकडे...
प्रेमाने पाहायला हवं...
हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत...
पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं...
तुही माझ्या सोबत असायला हवं...!
बाप 6 वर्षाच्या मुलाला : 'झोपुन जा बेटा नाहीतर
भुत येवुन जाईल'
.
मुलगा :- तुम्हा लोकांना रोमांन्स करन्यासाठी कारण पाहीजे फक्त,
मग तिकडे मुलाची भुताच्या नावाने फाटली तरी चालेल ;(
"आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात....
ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहातपण कारण
नसतानाही जेव्हा आश्रू येतात...
ह्याचा अर्थ तुम्हीप्रेमात आहात !!!
चला थोडा विरंगुळा म्हणून हे करून
बघा ...
तुमच्या बुटाचा नंबर तुमचे वय सांगू
शकतो ...?? हो ....करून बघा
खालील प्रमाणे...
१- तुमच्या बुटाचा साईज.
२- त्यास ५ ने गुणा
३- आलेल्या गुणाकरांत ५० मिळावा.
४- त्याला २० ने गुणा.
५- आलेल्या गुणाकारांत १०१3 मिळावा.
६- आता आलेल्या उत्तरांत आपले
जन्म वर्ष वजा करा. आलेल्या
उत्तरांत पहिला अंक हा तुमच्या बुटाचा
साईज आहे व उरलेले दोन अंक तुमचे
वय. काय आहे कि नाही माझे म्हणणे
बरोबर...???अजय इंगळे
वाटल होत तु परत येशील.....
म्हणुन डोँळ्यासमोर काळोख असतानासुध्दा
मी चालत राहीले..
मनात आशेची ज्योत जागवत राहिले...
वाटल होत तु परत येशील.....
मला करायची होती साथ सुख.दुःखाची
पण तुझी पावल माझ्याकडे वळलीच नाही..
वाटत होत तू परत येशील..
पण उरलय फक्त आत्ता नको असलेले जिण.
काळाच्या अफाट चक्रात उरलय फक्त भिरभिरण...
आज तुझी मला
खुपच आठवन आली
अश्रुनाही नयनात
जागा नाही उरली
क्षणात मन माझा
मागे गेला
आपल्या प्रेमाला
आठवू लागला
तुझ्याच आठवणित
मन माझा रमून गेला
स्वतालाच तो
विसरून गेला
नात तुने एकटीनेच
तोडल होत
प्रेम हे मात्र आपल
दोघांच होत.